2/06/2020

post 1

चित्त शुद्धी
बाहेरच्या कुठल्याही साधनाने चित्ताची शुद्धी करता येत नाही
म्हणूनच
चित्त शुद्ध करण्यासाठी आतमध्येच कशाचा तरी शोध घेतला पाहिजे
म्हणून कि काय
तुकाराम महाराज म्हणतात
तिर्थासी जाऊनी तुवा काय केले ! चर्म प्रक्षाळिले वरी वरी !!
अंतरीचे शुद्ध कासयाने झाले ??
याकरिता चित्त शुद्धीसाठी चित्तातच विराजमान असलेल्या परम पवित्र अंतर्यामी परमात्माच सर्व प्राणी मात्रा त्याचेच अंश आहे
अस मानुन चितंण केले तर
अंतकरण पवित्र होऊन चित्तशुद्धी होईल
जिवनात भगवंताच्या भक्तिला सुरुवात करणे
हळूहळू अंतकरणात ईश्वराविषयी भक्तिप्रेम वाढुन ईश्वरच ह्रदयात प्रकट होण
हिच खरी चित्त शुद्धी आहे
जय मुक्ताई👏🏻👏🏻👏🏻

0 comments:

Post a Comment