6/05/2015

Ashtvakra geeta part 2

एको द्रष्टासि सर्वस्य मुक्तप्रायोऽसि सर्वदा ।

अयमेव हि ते बन्धो द्रष्टारं पश्यसीतरम् ॥१-७॥

आप समस्त विश्व के एकमात्र दृष्टा हैं, सदा मुक्त ही हैं, आप का बंधन केवल इतना है कि आप दृष्टा किसी और को समझते हैं ॥७॥

You are the solitary witness of all that is, almost always free. Your only bondage is understanding the seer to be someone else.

......

अहं कर्तेत्यहंमानमहाकृष्णाहिदंशितः ।

नाहं कर्तेति विश्वासामृतं पीत्वा सुखं भव ॥१-८॥

अहंकार रूपी महासर्प के प्रभाववश आप 'मैं कर्ता हूँ' ऐसा मान लेते हैं। 'मैं कर्ता नहीं हूँ', इस विश्वास रूपी अमृत को पीकर सुखी हो जाइये ॥८॥

Ego poisons you to believe: “I am the doer”. Believe “I am not the doer”. Drink this nectar and be happy.

एको विशुद्धबोधोऽहं इति निश्चयवह्निना ।

प्रज्वाल्याज्ञानगहनं वीतशोकः सुखी भव ॥१-९॥

मैं एक, विशुद्ध ज्ञान हूँ, इस निश्चय रूपी अग्नि से गहन अज्ञान वन को जला दें, इस प्रकार शोकरहित होकर सुखी हो जाएँ ॥९॥

The resolution "I am single, pure knowledge”, consumes even the dense ignorance like fire. Be beyond disappointments and be happy.
एको द्रष्टासि सर्वस्य मुक्तप्रायोऽसि सर्वदा ।

अयमेव हि ते बन्धो द्रष्टारं पश्यसीतरम् ॥१-७॥

आप समस्त विश्व के एकमात्र दृष्टा हैं, सदा मुक्त ही हैं, आप का बंधन केवल इतना है कि आप दृष्टा किसी और को समझते हैं ॥७॥

You are the solitary witness of all that is, almost always free. Your only bondage is understanding the seer to be someone else.

यत्र विश्वमिदं भाति कल्पितं रज्जुसर्पवत् ।

आनंदपरमानन्दः स बोधस्त्वं सुखं चर ॥१-१०॥

जहाँ ये विश्व रस्सी में सर्प की तरह अवास्तविक लगे, उस आनंद, परम आनंद की अनुभूति करके सुख से रहें ।।१०।।

Feel the ecstasy, the supreme bliss where this world appears unreal like a snake in a rope, know this and move happily.

मुक्ताभिमानी मुक्तो हि बद्धो बद्धाभिमान्यपि।

किवदन्तीह सत्येयं या मतिः सा गतिर्भवेत् ॥१-११॥

स्वयं को मुक्त मानने वाला मुक्त ही है और बद्ध मानने वाला बंधा हुआ ही है, यह कहावत सत्य ही है कि जैसी बुद्धि होती है वैसी ही गति होती है ।।११।।

If you think you are free, you are free. If you think you are bound you are bound. It is rightly said: You become what you think.

आत्मा साक्षी विभुः पूर्ण एको मुक्तश्चिदक्रियः।

असंगो निःस्पृहः शान्तो भ्रमात्संसारवानिव ॥१-१२॥

आत्मा साक्षी, सर्वव्यापी, पूर्ण, एक, मुक्त, चेतन, अक्रिय, असंग, इच्छा रहित एवं शांत है। भ्रमवश ही ये सांसारिक प्रतीत होती है ।।१२।।

The soul is witness, all-pervading, infinite, one, free, inert, neutral, desireless and peaceful. Only due to illusion it appears worldly.

कूटस्थं बोधमद्वैतमात्मानं परिभावय। 

आभासोऽहं भ्रमं मुक्त्वा भावं बाह्यमथान्तरम् ॥१-१३॥

अपरिवर्तनीय, चेतन व अद्वैत आत्मा का चिंतन करें और 'मैं' के भ्रम रूपी आभास से मुक्त होकर, बाह्य विश्व की अपने अन्दर ही भावना करें ।।१३।।

Meditate on unchanging, conscious and non-dual Self. Be free from the illusion of 'I' and think this external world as part of you.

देहाभिमानपाशेन चिरं बद्धोऽसि पुत्रक । 

बोधोऽहं ज्ञानखंगेन तन्निष्कृत्य सुखी भव ॥१-१४॥ 

हे पुत्र! बहुत समय से आप 'मैं शरीर हूँ' इस भाव बंधन से बंधे हैं, स्वयं को अनुभव कर, ज्ञान रूपी तलवार से इस बंधन को काटकर सुखी हो जाएँ ।।१४।। 

O son, you are bound thinking- “I am body” since long. Experience the Self and by this sword of knowledge cut that bondage and be happy.

निःसंगो निष्क्रियोऽसि त्वं स्वप्रकाशो निरंजनः।

अयमेव हि ते बन्धः समाधिमनुतिष्ठति ॥१-१५॥

आप असंग, अक्रिय, स्वयं-प्रकाशवान तथा सर्वथा-दोषमुक्त हैं। आपका ध्यान द्वारा मस्तिस्क को शांत रखने का प्रयत्न ही बंधन है।।१५।।

You are free, still, self-luminous, stainless.Trying keep yourself peaceful by meditation is your bondage.

त्वया व्याप्तमिदं विश्वं त्वयि प्रोतं यथार्थतः ।

शुद्धबुद्धस्वरुपस्त्वं मा गमः क्षुद्रचित्तताम् ॥१-१६॥

यह विश्व तुम्हारे द्वारा व्याप्त किया हुआ है, वास्तव में तुमने इसे व्याप्त किया हुआ है। तुम शुद्ध और ज्ञानस्वरुप हो, छोटेपन की भावना से ग्रस्त मत हो ।।१६।।

You have pervaded this entire universe; really, you have pervaded it all. You are pure knowledge, don't get disheartened.

Guru geeta

(श्रीजगद्गुरु श्रीशंकर आणि जगन्माता पार्वतीदेवी ह्यांचा सिद्ध-साधक स्वरूपातील संवाद. ज्याद्वारे त्यांनी जगाला मोक्षाचा मार्ग समजावून दिला.)

सूत उवाच ।

कैलासशिखरे रम्ये, भक्तिसंधान-नायकम् । प्रणम्य पार्वती भक्त्या, शंकरं पर्युपृच्छत ॥१॥

रम्य अशा कैलास शिखरावर, भक्तीचे साधन सांगण्यात कुशल असलेल्या श्रीशंकराला, भगवान शिवाला, भक्तीपूर्वक नमस्कार करून मोठ्या भक्तिभावाने पार्वतीने प्रश्न विचारला.

श्रीदेव्युवाच ।

ॐ नमो देवदेवेश, परात्पर जगद्‌गुरो । सदाशिव महादेव, गुरुदीक्षां प्रदेहि मे ॥२॥

पार्वतीदेवी म्हणाली, हे देवांच्या देवा, परात्पर म्हणजे महानाहून महान अशा सद्गुरो, तुला प्रणाम ! सदा कल्याणप्रद शिवा, सर्व स्थळ, काळ व्यापून असणाऱ्या महादेवा, मला गुरुदीक्षा द्यावी. ॥२॥

केन मार्गेन भॊ स्वामिन्, देही ब्रह्ममयो भवेत् । त्वं कृपां कुरु मे स्वामिन्, नमामि चरणौ तव ॥३॥

हे स्वामिन्, देहधारी असूनही कोणत्या मार्गाने गेले असता ब्रह्ममय होता येईल ते कृपा करून सांगावे. हे स्वामी, हे गुरुदेव, मी आपल्या चरणांवर मस्तक ठेवून नमस्कार करते. ॥३॥

ईश्वर उवाच ।

ममरूपासि देवी त्वं, त्वत्प्रीत्यर्थं वदाम्यहम् । लोकोपकारकः प्रश्नो, न केनापि कृतः पुरा ॥४॥

हे देवि, तू माझेच दिव्य रूप, स्वरूप आहेस. तू प्रसन्न व्हावीस म्हणून सांगतो. सर्व लोकांना उपकारक असा हा प्रश्न पूर्वी कोणीही केला नाही. ॥४॥

दुर्लभं त्रिषु लोकेषु, तच्छृणुष्व वदाम्यहम् । गुरुं विना ब्रह्म नान्यत्, सत्यं सत्यं वरानने ॥५॥

हे श्रेष्ठ पार्वती ! तिन्ही लोकांत दुर्लभ असे गुरुतत्त्व मी सांगतो ते ऎक. श्रीगुरुच सदोदित ब्रह्म होय. श्रीगुरुशिवाय दुसरे ब्रह्म नाही. हे सत्य मी तुला द्विरुक्तीने सांगतो. ॥५॥

वेदशास्त्रपुराणानि इतिहासादिकानि च । मंत्रयंत्रादिविद्याश्च, स्मृतिरुच्चाटनादिकम् ॥६॥

वेदशास्त्रे, पुराणे, इतिहास इ. तसेच मंत्रयंत्रादि विद्या, स्मृतिउच्चाटन, तीर्थ, व्रत, तप, साधना कितीही घडली तरी संसारबंधनातून मुक्तता होत नाही. ॥६॥

शैवशाक्तागमादीनि, अन्यानि विविधानि च । अपभ्रंशकराणीसह, जीवानां भ्रांतचेतसाम् ॥७॥

शैव, शाक्त, शास्त्रे, आणि इतर विविध पंथ चित्तभ्रांत जिवांना चुकीचा समज गैरसमज करून देण्यास मात्र कारणीभूत होतात. ॥७॥

यज्ञो व्रतं तपो दानं, जपरतीर्थं तथैव च । गुरुतत्त्वमविज्ञाय, मूढास्ते चरते जनाः ॥८॥

यज्ञ, व्रत, तपश्चर्या, दानधर्म, जप, तीर्थयात्रा करणारे लोक जोवर गुरुतत्त्व जाणत नाहीत तोपर्यंत मूर्खासारखे भटकतात, वागतात. ॥८॥

गुरुबुद्धयात्मनो नान्यत् सत्यं सत्यं न संशयः । तल्लाभार्थ प्रयत्नस्तु, कर्तव्यो ही मनीषिभिः ॥९॥

ज्ञानस्वरूप आत्म्याहून श्रीगुरू भिन्न नाही. गुरुविषयी पूज्य बुद्धी, श्रद्धा असली की मग गुरुभक्ताला दुसरे काही कर्तव्य नाही, हे अगदी खरे (द्विवार सत्य) होय. ॥९॥

गूढविद्या जगन्माया, देहे चाज्ञानसंभवा । उदयः स्वप्रकाशेन, गुरुशब्देन कथ्यते ॥१०॥

ह्या देहात अज्ञानाने उत्पन्न झालेली जगन्माया गुप्त विद्येच्या रूपात राहाते. आत्मप्रकाश वा आत्वविकासाने ज्ञानाचा उदय होतो. गुरू शब्दाने तो उदय दर्शविला जातो. सद्गुरू स्वयंप्रकाशी असतो. ॥१०॥

सर्वपापविशुद्धात्मा, श्रीगुरोः पादसेवनात् । देही ब्रह्म भवेद्यस्मात्, तत्कृपार्थं वदाभि ते ॥११॥

श्रीगुरुचरणाच्या सेवेने अंतःकरण सर्व पापांपासून शुद्ध होऊन जाते. त्यामुळे देहधारी जीव ब्रह्मरूप बनतो. त्या गुरुकृपेचे तत्त्व, तुझ्यावर गुरुकृपा व्हावी म्हणून मी तुला कथन करतो. ॥११॥

गुरुपादांबुजं स्मृत्वा, जलं शिरसि धारयेत् । सर्वतीर्थावगाहस्य, संप्राप्नोति फलं नरः ॥१२॥

श्रीगुरुचरणकमलांचे स्मरण करून मस्तकावर पाणी ओतले असता म्हणजेच स्नान केले असता (चरणतीर्थ मस्तकी धारण केल्यास), सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफल साधकाला मिळते. सद्गुरुचरणतीर्थ निरंतर सर्व तीर्थांचे माहेर होय. ॥१२॥

शोषणं पादपंकस्य, दीपनं ज्ञानतेजसाम् । गुरुपादोदकं सम्यक्, संसारार्णवतारकम् ॥१३॥

श्रीगुरुचरणतीर्थ पापरूपी चिखलाला सुकविणारे, पापहारक आहे. ज्ञानरूपी तेजाला उज्ज्वल, अधिक प्रकाशित करणारे, ज्ञानवर्धक आहे. संसारसागरातून पार करणारे तारक आहे. ॥१३॥

अज्ञानमूलहरणं, जन्मकर्मनिवारणम् । ज्ञानवैराग्यसिद्धयर्थं, गुरुपादोदकं पिबेत् ॥१४॥

समूळ अज्ञान दूर करणारे, जन्म आणि कर्म ह्यांचे निवारण करणारे हे गुरुपादोदक, श्रीगुरुचरणतीर्थ, ज्ञान आणि वैराग्यप्राप्तीसाठी प्राशन करावे. ॥१४॥

गुरोः पादोदकं पीत्वा, गुरोरुच्छिष्टभोजनम् । गुरुमूर्तेः सदा ध्यानं, गुरुमंत्रं सदा जपेत् ॥१५॥

गुरुचरणतीर्थ प्राशन करून, श्रीगुरुआज्ञापालन हेच उच्छिष्ट भोजन मानून, श्रीगुरुमूर्तीचे अंतरी सदैव ध्यान करित गुरूने दिलेल्या मंत्राचा सदा जप करावा. ॥१५॥

काशीक्षेत्रं तन्निवासो, जान्हवी चरणोदकम् । गुरुर्विश्वेश्वरः साक्षात्, तारकं ब्रह्म निश्चितम् ॥१६॥

श्रीगुरुचे निवासस्थान म्हणजेच काशीक्षेत्र, चरणतीर्थ म्हणजेच गंगा, श्रीगुरू म्हणजेच प्रत्यक्ष श्रीविश्वेश्वर समजावेत, श्रीगुरुच मानवाला तारणारे निश्चित ब्रह्मस्वरूपच होत. ॥१६॥

गुरोः पादोदकं यत्तु, गयाऽसौ सोऽक्षयो वटः । तीर्थराजः प्रयागश्च, गुरुमूर्ते नमो नमः ॥१७॥

श्रीगुरुचे चरणतीर्थ हेच प्रत्यक्षात गयातीर्थ होय. गुरुच जणू गयेचा चिरंतन वटवृक्ष होय. सर्व तीर्थात जे प्रमुख प्रयाग तीर्थ ते गुरुच होय. अशा महान गुरुमूर्तीला द्विवार नमस्कार असो. ॥१७॥

गुरुमूर्ति स्मरेन्नित्यं, गुरुनाम सदा जपेत् । गुरोराज्ञां प्रकुर्वीत, गुरोरन्यन्न भावयेत् ॥१८॥

श्रीगुरुमूर्तीचे नित्य स्मरण करावे, गुरुनामाचा सदा जप करावा, श्रीगुरुची आज्ञा मनःपूर्वक कटाक्षाने पाळावी, गुरुखेरीज मनात अन्य भावभावना ठेवू नये. ॥१८॥

गुरुवक्त्रस्थितं ब्रह्म, प्राप्यते तत्प्रसादतः । गुरोर्ध्यानं सदा कुर्यात्, कुलस्त्री स्वपतेर्यथा ॥१९॥

गुरु ब्रह्मरूप होय. गुरुमुखस्थित ब्रह्म हे गुरूच्या कृपेनेच प्राप्त होते. म्हणून कुलीन स्त्री ज्याप्रमाणे आपल्या पतीचे चिंतन करते त्याप्रमाणे स्त्रीगुरुचे ध्यान, चिंतन सदा करावे. ॥१९॥

स्वाश्रमं च स्वजातिं च, स्वकीर्तिपुष्टिवर्धनम् । एतत्सर्व परित्यज्य, गुरोरन्यन्न भावयेत् ॥२०॥

आपले घरदार, आपली जात, कुळ, वंशाभिमान, आपली कीर्ति, वैभव, कला, विद्या, धन इ. वृद्धीचा लोभ, हाव, आसक्ती सोडून देऊन केवळ गुरुशिवाय इतर कोठेही कशावरही भावना ठेवू नये. एकमेव गुरुच भजावा. गुरुचेच ध्यान करावे. ॥२०॥

http://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE

सुख समाधान भक्ती

पदूभटजी विष्णूपाद स्वामींचे निस्सीम भक्त, विष्णूपाद स्वामी जेंव्हा देहं धारण करून होते तेंव्हा पदूभटजींकडे दोनदा आले होते त्यात एकदा त्यांचे श्रीचरण धुतले तेंव्हा ते ओल्या पावलानी घरभर फिरले त्यात मधल्या खोलीच्या दाराशेजारी त्यांच्या श्री चरणकमलांचे जे ठसे उमटले ते कायमचे... तो पदूभटजीच्या घराण्याला मिळालेला प्रसाद होता
पदूभटजीना दोन मुलगे श्रीरंग आणि श्रीराम 
पदूभटजी एकशेपाच वर्ष जगले प्रकृती उत्तम,किंवा पंचेंद्रिय पूर्ण कार्यरत.... वृती..समाधानी
त्याना आपला मरणकाळ कळला होता मोठ्या समाधानाने त्याना आपल्या लेकी सुना नातवंड पतवंडाना एकत्र यायला सांगितलं आपल्या दोन्ही मुलाना चार हिताच्या गोष्टी सांगितल्या दोन्ही मुलं गुणाचीच होती पदूभटजींच्याच तालमीत मोठी झाली होती पण तरी धाकट्याची वृत्ती जरा अस्वस्थ असायची... त्याला बाहेरचही जग खुणावायचं पदू भटजी असे पर्यंत त्यानी स्वत:ला आवरलं होतं पदूभटजी एकादशीचा मुहूर्त साधून गेले त्यांचं नीर्वाण म्हणजे एक सोहळाच होता डोळे मिटायच्या आधी साक्षात विष्णूपाद स्वामीनी विदेही असताना त्याना दर्शन दिलं तसच त्यांच्या मठाचे अधिपती गोवींद स्वामी स्वत: पदूभटजीना शेवटचा निरोप द्यायला आले होते...
दिवस कार्य पार पाडल्यावर गोवींदस्वामी जायला निघाले दोन्ही बंधू निस्सीम श्रद्धेने त्यांच्या पाया पडले... गोवींदस्वामीनी आपल्या पोतडीतून दोन चांदीचे शिक्के काढले म्हणाले स्वामी महात्म्यानी मला एकूंण एकावन्न शिक्के मला प्रसादासाठी दिले त्यातले आज पहिल्यांदीच मी दोन शिक्के काढतोय महात्मनांचा प्रसाद म्हणून तुम्हा दोघाना देतोय तुमचं कल्याण होईल...
दोघानी श्रद्धापुर्वक ते शिक्के स्विकारले आणि पुजेत ठेवले पुढे कर्मधर्म संयोगाने किंवा श्रीरामाच्या इछ्चेनुसार त्याला शहरात नोकरी मिळाली त्याने आपले बिर्हाड हलवले आणि तो शहरात स्थायीक झाला... श्रीरामाला दोन मुलगे एक मुलगी आणि मोठ्या श्रीरंगालाही दोन मुलगे एक मुलगी
त्यात पून्हा गम्मत अशी की धाकट्या दोघी दोन्ही घरात एकाच दिवशी येत्या झाल्या.. दोघींचा वाढदिवस एकाच दिवशी
त्याच वेळी श्रीरामाला व्यापाराची एक मोठी संधी चालून आली भांडवलाची गरज होती श्रीरंग खाऊन पिऊन सुखी होता त्याने जरी मदतीचा हात पुढे केला तरी त्याला मर्यादा होत्या पण तरी हिम्मत करून श्रीरामाने भांडवल उभं केलं पण तरी एकशेतीस रुपये कमी पडत होते जिद्दीला पेटलेल्या श्रीरामाने एक निर्णय घेतला आणि पत्निलाही पत्ता नं लागू देता प्रसादाचा चांदीचा शिक्का उचलला त्या शिक्क्याची डबी पुजेत होती आणि ती कायम तुळशीपत्र फुलानी झाकेलेली असायची पत्निला या चोरीचा पत्ता लागणं शक्य नव्हतं श्रीरामाने मनोभावे विष्णूपादांची क्षमायाचना केली व्यापार उद्यमला सहाय्य करायची प्रार्थना केली.. आणि तो शिक्का त्याने पेढीवर विकायला निघाला शिक्का बघून तो मारवाडीही चकीत झाल म्हणला अशी चोक्कच चांदी तुम्हाला भेटली कुठे?... त्याने मोजून एकशे पस्तीस रुपये दिले... आणि काय सांगू राव त्या भांडवलात हे एकशे पस्तीस रुपये काय पडले त्या भांडवलाचं भंडार झालं दिन दुगनी रात चौगनी अशी तरक्की त्याची होत राहीली पैसा आडका जमीन जुमला कशला काही कमी नाही.. आता श्रीरामाला तो शिक्काही परत हवा होता तो खुपशी रक्कम मठला दान करता झाला गोवींद्स्वामीनी निर्व्याज वृत्तीने त्याला आशिर्वाद दिले.. आणि जरा ओशाळत श्रीरामाने आणखी एक शिक्का त्यांच्याकडे मागितला पण स्वामीनी त्याला मात्र नम्र नकार दिला म्हणाले महात्मनांचा आदेश नाही तर तो प्रसाद तुम्हला परत कसा देऊ? तुम्ही तो शिक्का जिथे ठेवलाय तिथे तो सुखरूप आहे...
श्रीरंगाची मुलही शिकून सवरून मोठी झाली मोठा मुलगा तर डाक्टर झाला पण तो गावातच प्राक्टीस करत राहिला धाकटा प्रोफेसर झला पण तो ही जिल्ह्याचा गावी एका कालेजात नोकरी करता झाला..
श्रीरामाची मुलं त्याच्यापेक्षा महत्वाकांक्षी निघाली त्यानी वडिलानी सुरू केलेला व्यवसाय जगभर पसरवला.. आता ते राजकारणात शिरण्याचे मनसुबे आखायला लागले आणि श्रीराम या आपणच वाढवून ठेवलेल्या व्यापाला घाबरला.. जरा आजारी झाला लगे़च श्रीकांत आला आणि त्या दोघाना आपल्याकडॆ गावाला घेऊन आला
श्रीरामाच्या घरापुढे श्रीरंगाचं घर अगदी साधं होतं पण या दोघाना इथला निवांतपणा मनाला भावला सकळी न्यहारीला साधे दही पोहे नाहीतर भाकरीचा काला असयचा शहरात त्याच्या घरी त्याचा स्वैपाकी ब्रेकफास्ट साठी अख्खं टेबलभर पदार्थ मांडायचा पण ही चव त्या पदार्थाना नव्हती... इथल्या सारखा झुळू झुळू वारा त्यांच्याकडे नव्हता या घरीही पाहुण्यांची ये जा होती पण तिथल्या सारखा कोरडेपणा यात नव्हता... श्रीरंगाची बायको श्रीरामच्या आवडी निवडी लक्षात ठेऊन रोज स्वैपाक करायची त्यात तिचा केवळ याला खुष करण्याचा हेतू नव्हता तर माया होती प्रेम होतं आपलं वैभव या सुखापुढे थीटं वाटायला लागलं आपण तो शिक्का विकून पाप केल्याची भावना त्याच्या मनात बळावली.. तो अधीकच अस्वस्थ झाला घरचा डाक्टर होता पुतण्या काकाकडे काळजीने लक्ष देत होता पण तरी काकाच्याअस्वस्थतेचं नेमकं कारण त्याला मिळत नव्हत शेवटी तो म्हणला काका जे मनात आहे ते स्पष्ट बोला आम्ही तुमचीच माणसं आहोत खात्री बाळगा..
आणि श्रीरामाचा बांध फुटला आणि त्याने प्रसादाचा शिक्का उद्यमासाठी विकल्याचं सांगितलं त्याच्या प्रियपत्निलाही हा धक्काच होता..इतकी वर्ष आपण रिकाम्या डबीची पुजा करत होतो?
शेवटी दोन्ही बंधू सहकुटूंब विष्णूपाद स्वामींच्या मठात गेले झाल प्रकार गोवींदस्वामीना सांगितला ते म्हणाले हे सांगायला मुद्दाम इथे कशाला आलात? त्याने तो शिक्का जेंव्हा विकला तेंव्हाच मला कळलं मौज बघा याने ज्याला तो प्रसादाचा शिक्का विकला तो मात्र तो शिक्का जिवापाड जपून आहे आणि त्याच्या वृत्तीत भलताच फरक पडलाय
आणि इथे येऊन क्षमा मागायची काहीच गरज नाही तो तुम्हला दिल्रेला प्रसाद होता त्याचा विनियोग तुम्ही तुमच्या मताने करू शकता
मग श्रीराम म्हणला मग असं का झालं ? दादाच्या घरी साध्या पाण्याच्या घोटातही स्माधानची चव आहे ती माझ्याकडे का नाही?
गोवींदस्वामी मंद हसत म्हणाले अरे महात्मन समाधानच वाटत फिरत असतात त्या बदल्यात तू सुख मागितलस महात्मनानी तुला दिलं श्रीरंगाने तो प्रसाद जपला म्हणून समधान त्याच्यापाशी राहिलं
मग आता मला कधीच समधान मिळणार नाही का?
आता मात्र गोवींदस्वामी जोरात हसले म्हणाले हा तुच तयार केलेला भ्रम आहे आणि त्याच भ्रमात तू राहतोयस अरे नोकरी धंद्यासाठी तू घर सोडून शहराकडॆ रवाना झालास पण मुळ हे घर तुझच आहे
तुझा डोलारा तू शहारत उभा केला असलास तरी पाया हाच आहेना? दोन्ही भाऊ एकाच पदूभटजींची अपत्य आहात महात्मनांच्या आशिर्वादाने तू उत्कर्ष साधालास तर मोठ्याने समधान राखलं तुम्ही दोघे एकत्र आहात हे कधी विसरू नका म्हणजे दोन्ही तुमच्याकडे राहील...असं म्हणूया महात्मनाना हेच अपेक्षीत होतं म्हणून त्यानी तुम्हा दोघाना वेगवेगळे शिक्के दिले श्रीरंग समाधानात होता म्हणून त्याला सुखाची वेगळी गरज भासली नाही याचा अर्थ तू चुकलास असा होत नाही आयुष्य परीपूर्ण जगायचं तर दोन्ही गोष्टी हव्यातच फक्त सुप्त अहंकारापोटी तुम्ही विलग होता ते होऊ नका भले आपआपल्या व्यापात रहा पण मनाने वृत्तीने एक रहा की सगळं तुमचच आहे... अतीव आनंदाने श्रीरामाला ग्लानी आली गोवींदस्वामी त्याला मायेने थोपटत राहिले... आता तो शुद्धीवर आलाकी त्याची नवी सुरुवात असेल.

~ चंद्रशेखर  गोखले