3/16/2020
quote 3
quotes
post
भक्तिरंग २
🙏🏻🌹🙏🏻स्वामी माझी माऊली 🙏🏻🌹🙏🏻
🌹🌹!!श्री स्वामी समर्थ!!🌹🌹
🌺फलदायी बिरुदावल्या🌺
!! दिव्यज्ञानदाता - ॐ श्री स्वामी समर्थाय नमः !!
विश्लेषण व अर्थबोध
क्र २३३) दिव्यज्ञान म्हणजे खूप आगळे वेगळे गूढ रम्य असते असे समजण्याचे काहीच कारण नाही यासाठी खूप उच्च पदवीचीही गरज नसते व्यावहारिक शहाणपण सर्वांप्रती दया क्षमा शांती आणि करूणा माणुसकीचा गहिवर मनाची संवेदनशीलता दुसऱ्याचे सुख दुःख जाणण्याची क्षमता याला दिव्यज्ञान म्हणता येईल यासाठी सदगुरूकृपा म्हणजे श्री स्वामी समर्थांची महत्त्वाची असते अध्यात्मिक दृष्ट्या गुरूकृपा म्हणजे काय यासाठी उपासक (साधक) कसा असावा याबाबत मार्गदर्शन करताना श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, "अवगुणांचा करूनि त्याग ! जेणे धरिला संतसंग !!१!! तयासी बोलिजे मग ! साधक ऐसा !!२!! (दा.५.९.२) देहबुद्धी विवेके वारी ! आत्मबुद्धी सदृढ धरी !! श्रवण मनन केलेचि करी ! या नाव साधक !!" दिव्यज्ञान प्राप्तीसाठी साधकात याबाबी आवश्यक आहेत आयुष्यात सुख समाधान शांतीसाठी दिव्यज्ञान प्राप्तीची तहान भूक लागावयास हवी की तहान भूक दिव्यज्ञानदाता श्री भागवू शकतात पुस्तकी ग्रंथीय शालेय कॉलेजमधील व अन्य शैक्षणिक संस्थामधून घेतलेले विविध प्रकारचे ज्ञान त्यांच्या ज्ञानदाता या बिरुदावलीत पूर्णतः अपेक्षित नाही केवळ अनुभवी ज्ञान ही यात गृहित नाही सर्व मानव जातीबद्दल दया क्षमा शांती आणि करूणेचे ज्ञान यातील सदसदविवेक सर्वाप्रती सहानूभूती आणि संवेदना याबाबत जे ज्ञान ते खरे ज्ञान त्याला दिव्यज्ञान म्हणता येईल श्री गुरूचरित्राच्या १६ व्या अध्यायात "संतुष्ट करिता गुरूसी ! काय न साधे तयाशी ! वेदशास्त्र ज्ञानराशी ! लाभे क्षण न लागता !!१३७!!" असे हे ज्ञान सदगुरू श्री स्वामी समर्थ कृपेतून प्राप्त होऊ शकते त्यासाठी त्यांची नित्य नियमाने डोळस सदसदविवेक बुद्धी जागृत ठेवून उपासना करावयास हवी त्यामुळे उपासकामधील अनिष्ट विचार विकाराची अंधारी रात्र संपून ज्ञानाची पहाट होते कारण ज्ञानदाता याबाबत श्री संत ज्ञानेश्वर माऊली अगदी सहज लिहून जातात. "गुरू तेथ ज्ञान ! ज्ञानी आत्मदर्शन ! दर्शनी समाधान ! आथी जैसे !!१८.१६३७!!" या बिरुदावलीची पार्श्वभूमी व भूमिका समजावून घेण्यासाठी श्री संत समर्थ रामदास स्वामी व श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या काही वचनांचा मुद्दाम उल्लेख केला दिव्यज्ञान म्हणजे काय यासाठी ज्ञान ज्ञानाच्या कक्षा माहितीवरून घ्यावयास हव्यात हा इथला प्रथम अर्थबोध आहे. (क्रमशः)
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
अशक्यही शक्य करतील स्वामी
हम गया नहीं जिंदा है
लेखक 🌹प्रा डॉ यशवंतराव पाटील सर🌹नाशिक
मो.९८९०६१५६४९
हा ग्रंथ स्वानंद क्रियेशन येथे उपलब्ध आहे
पत्ता :- अर्थव अर्पामेंट ३९७ शनिवार पेठ पुणे पिन को.४११०३०
मो.नं.९८२३०१४८६२ / ९७६६५४१०९९
Hard copy Available online at :- www. bookganga.com & www.egranthalaya.com
email :- sales@egranthalaya.com
🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻